Saturday, October 29, 2011

एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी आपली प्रत्येक गोष्ट हसण्यात घेणारी
आयुष्याच्या वाटेत काटे रुतल्यावर,
ती आपल्याला मलमपट्टी करणारी
मरेपर्यंत मैत्री टिकवण्याचे,
ती वचन पाळणारी
माझी प्रत्येक गोष्ट,
ती थट्टा मस्करीत घेणारी
आपले अहंकार बाजूला ठेवून,
मला समजून घेणारी
हवेशी नाते नसलेली,
जमिनीवर पाय असलेली
मैत्री आणि प्रेम यात,
राजकारण न आणणारी
दुसऱ्याबरोबर व्यस्त न होता,
क्षणाक्षणाला साथ देणारी
स्वतःला ऐश्वर्या न समजता,
ती माझा आरसा बनणारी
एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी मैत्री तोडण्याची भाषा न करणारी.

Thursday, October 20, 2011

भावना व्यक्त करायला,
उमजवावे लागते
सत्य लपवायला,
खोटे बोलावे लागते..
भांडण करायला,
कळीचा मुद्दा लागतो..
तिरस्कार करायला,
अहंकार लागतो..
वचन पाळायला,
मन लागते,
वाद मिटायला,
पिढ्या लागतात..
प्रेम कळायला,
अंतकरण लागतात..


Monday, October 17, 2011





आकर्षणालाच प्रेम जरी समजायला लागला,
एकतर्फी प्रेमाचा बंध त्याने बांधला ..

वेळ नाही दडवायची म्हणाला,
पण आयुष्य कमी पडले त्या प्रेमाला ..

Saturday, October 15, 2011

प्रेमाचा एक संदेश ..

प्रेमासाठी आणि त्या हेमासाठी आयुष्यात कधी chance मारायचा मौका नशिबात आलाच नाही,
जेव्हा मौका मिळाला तेव्हा फुकट सर्व मिळालेलं असत.
तरीपण म्हणेन, प्रेम करण सोपं असत पण ते निभावन खूपच कठीण,
कोणाचा जीवापाड विचार करायचा याची त्यालाही जाणीव होऊ द्यायची.
पण propose चा कधीच Ladies Fast नसतो,
ते पण बर असत म्हणा, उगाच पुरुष एखाद्या स्रीला नाही कसा बोलू शकतो.
जणूकाही divorce चा option available व्हावा तसा
मैत्री आणि प्रेमात खूप फरक निर्माण करण्याचा प्रयत्न होतो,
हे वयात आल्यावर कळत.
कोणाला होकार देऊन नंतर नाकारण्यापेक्षा,
गप्प राहून मैत्री टिकवणेच योग्य.
प्रेमाचा संदेश आणि संदेशचा प्रेम या शब्दांमध्ये तफावत होऊन मग,
भावनांना वाट मोकळी करायची भीती वाटते.
घाबरला, डरपोक म्हणून कुजबुज ऐकू येते,
पण हिम्मत करायची किंमत आयुष्यभर मोजावी लागते.
काहीकाळ कोणाबरोबर चालायचे,
आणि मध्येच साथ सोडायचा म्हटल्यावर मनाला काटा रुतावा अशा असह्य वेदना होतात.
काहीजण काहीवेळासाठी वाट पाहून मग,
समोरच्याला ignore करू लागतात.
आपल्यामधील मैत्री अशीच अतूट राहील सांगत,
प्रेमापेक्षा मैत्रीच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करतात.

तुमचाच संदेश

अधुरी एक कहाणी

कोणालातरी आपण प्रेमाच्या शिखरावर चढवावे मग आपल्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करावी अस का होत ? समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला समजलेला असतो मैत्री पलीकडे त्याच्याबद्दल काहीच मनात उरत नाही पण ज्याला प्रेम जडलाय त्याचे काय ? भावनांच्या अवेगातून खूप मोठा अपघात झालेला असतो नंतर मग छोटासा कारण समोर करून वेगळ होणंच अपेक्षित असत.

Saturday, July 30, 2011

dukh

Konala dukh detanna tya dukhachi aplyala janiv asudya